खुप वाटते कधीतरी
मुसळधार पावसात चिंब भिजावं
खोटा खोटा पैसा देऊन पावसाला
पुन्हा पुन्हा बोलवावे
खुप वाटते कधीतरी
मनसोक्त गावं
आयुष्याचे सुर निसटले तरी
काहीतरी गुणगुणावं
खुप वाटते कधीतरी
जोरजोरात रडावं
मनातले दुःख
एकदातरी जगासमोर मांडावं
खुप वाटते कधीतरी
दूर करावी ही घुसमट
मोडून मनाची दार
तोडावी ही आयुष्याची चौकट
कितीही वाटले तरीही
खरचं हे शक्य असते?
नियतीला चुकवून पुन्हा खेळ मांडणं
खरच इतके कठिण असतं?
No comments:
Post a Comment