जरा अनावर होता
जेव्हा बंध दरवळ होतो
चोरट्या त्या कटाक्षांचा
तेव्हा अवखळ बोभाटा होतो
ऐन सांजेच्या उंबर्यात ओढ उपरेपणाची
रात्रीच्या ओल्या गर्भात जाग वांझोट्या स्वप्नांची
निरोपाच्या वळणावरचे टाळलेले स्पर्श
हुरहुरत्या श्वासांच्या लयीत गंधाळलेले स्पर्श
कधी भैरवी कधी मारवा
सूर मनाचा सांगून जातो
ओंजळीत गंधाळलेले
कोवळे नाते देउन जातो
इतना भी कहां हम अपने खुदाको चाहते है
मौत की कगारपे तो उसके मुलाकात से डरते है
तेरे होने की जब आहट भी नहीं थीं
ए खुदा जिंदगी तब भी इतनी मुश्किल तो नहीं थीं
कई अरसों बाद बस्स मुलाकात हुई हैं खुदसे
एक पलमें कहाँ वैसे जिंदगी की तलाश खत्म होती हैं
खरं सांग शिल्लक किती देवा जुनी पाप पुण्य
नव्या प्राक्तनांना उगा जुन्याचे आता अडसर नको
किसकी बगावत हैं ये क्या पता ए खुदा
अजनबी भीड़ का चेहरा रोज आइने में जो दिखता हैं
लाख असतील गोठलेली स्वगते जरी मौनातली
हळव्या नाजूक हुंकाराची तरी सांग भाषांतरे केली कुणी
ना लख्ख प्रकाशाचा ना मिट्ट काळोखाचा असतो
खरा प्रश्न नेहमीच फक्त मिणमिणणारा असतो